महाराष्ट्र जनमत न्यूज 

अमळनेर शहरातील तिरंगा चौक ते मुख्य बाजारपेठ चौक परिसरात आज सायंकाळी घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गावर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नाल्यातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेची, वाहतुकीची आणि सार्वजनिक आरोग्याची कोणतीही काळजी घेतली गेली नसल्याचा आरोप होत आहे.

⚠️ सडलेला, दुर्गंधीयुक्त आणि रोगराईला आमंत्रण देणारा नाल्याचा गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढून ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. भरलेला गाळ रस्त्यावर सांडत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना चालणेही कठीण झाले होते.

विशेष म्हणजे हे काम शहरातील सर्वाधिक गर्दीच्या वेळेत आणि मुख्य बाजारपेठेच्या मध्यभागी सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अनेक नागरिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.

🔥 आरोग्य विभागच आरोग्यासाठी धोका?

नागरिकांना स्वच्छतेचे आणि आरोग्याचे धडे देणाऱ्या आरोग्य विभागानेच सार्वजनिक रस्त्यावर नाल्यातील गाळ सांडून ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. गाळातून निर्माण होणारी दुर्गंधी, जंतू आणि संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

⚡ नागरिकांचा सवाल

👉 गर्दीच्या वेळेतच हे काम का करण्यात आले?
👉 गाळ वाहून नेताना तो रस्त्यावर सांडू नये यासाठी उपाययोजना का केल्या नाहीत?
👉 वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
👉 आरोग्य विभाग स्वतःच आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?

💥 “एकीकडे स्वच्छ शहराचे दावे आणि दुसरीकडे मुख्य रस्त्यावर दुर्गंधीयुक्त नाल्याचा गाळ”, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

🚨 अमळनेर नगर परिषद आरोग्य विभागाचा हा निष्काळजीपणा की नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला उघडपणे खेळ? याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

✍️ महाराष्ट्र जनमत न्यूज — जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निर्भीड व्यासपीठ! 🔥📰

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *